Thursday 7 January, 2010

आठवण

आमच्या कवितेचा विषय आमची 'ती'.......दुसर्‍या विषयावर कविता जमत नाहीत :)

जाता दुरदेशी वाटलं होतं विसरेन तूला
पण नुसत्या विचारानेच त्रासले मला
नाही विसरू शकलो मी
येते का कधी आठवण गं माझी?

शेवटचे पाहिले तुला त्या दिवशी
सोडवायला ही आली नाहीस तू
वाट बघून वाट धरली मी प्रवासाची
अशी का पाठवण केलीस गं माझी?

पहिल्याच दिवशी पावसाने स्वागत केलं
आठवली आपली पहिल्या पावसातली
एकाच छत्रीतली सफर बसस्टॉपवरची
पावसाने का पाठ सोडली नाही गं माझी?

मनाची समजूत घालत फोन केला तूला
आवाज ऐकताच मनातलं एक वादळ शांत झालं
आणी दुसर्‍या शिडाला वारा भेटला
या वेगालाही का कीव नाही आली गं माझी?

आता थोडेच दिवस उरलेत इथे
परत येताच घ्यायचीय पहिली तुझी भेट
सांगायचय सगळं मनापासून थेट
समजशील का गोष्ट मनीची गं माझी??

No comments:

Post a Comment